India cricket toss record भारताचा सलग 18वा ODI टॉस पराभव! पण मैदानात भारताचा दबदबा कायम. शुभमन गिलच्या विनोदी उत्तराने पत्रकार परिषदेत हास्य, तर रोहित-विराटने रचला दमदार विजय.
India cricket toss record – ” Team India चा 18वा टॉस पराभव! शुभमन गिलचं भन्नाट उत्तर – ‘घरवालेही बोलतात काहीतरी कर टॉससाठी ! “
Sydney ODI – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही टॉसचे नशीब टीम इंडियाकडे फिरले नाही. ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि यामुळे भारताचा सलग १८वा टॉस पराभव नोंदवला गेला.
भारताने शेवटचा टॉस जिंकला होता २०२३ च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध, वानखेडे स्टेडियमवर. त्यानंतरपासून टीम इंडियाचं नशीब नाण्याशी जुळलेलं दिसत नाही.
गिलचा मजेशीर प्रतिसाद – “घरवालेही सांगतात टॉससाठी काहीतरी कर!”
Shubman Gill funny comment – सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा कर्णधार शुभमन गिलला विचारलं गेलं की टॉससाठी काही स्ट्रॅटेजी आखली आहे का, तेव्हा त्याने हसत उत्तर दिलं –
“माझ्या घरचेही बोलतात, काहीतरी कर टॉससाठी! पण काय करायचं सांग ना?”
गिलच्या या विनोदी उत्तराने उपस्थित सगळे पत्रकार हसले. या उत्तरातून गिलचा हलकाफुलका आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन दिसून आला. टॉस हारण्याची मालिकाच सुरू असली तरी टीममध्ये ताणतणावाचं वातावरण नाही, हे स्पष्ट होतं.
रोहित आणि कोहलीचं जबरदस्त पुनरागमन
Rohit Sharma Virat Kohli partnership – टॉस हरला असला तरी मैदानात भारताने अफलातून कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ठरले दोन दिग्गज – रोहित शर्मा आणि विराट कोहली.
दोघांनीही जुने दिवस आठवण करून देत १६८ धावांची नाबाद भागीदारी केली. भारताने फक्त ३९१ चेंडूत (६९ बॉल्स शिल्लक ठेवून) २३७ धावांचं लक्ष्य गाठलं आणि मालिकेचा शेवट शानदार केला.
गिलने त्यांच्या कामगिरीचं कौतुक करत म्हटलं –
“रोहित भाऊ आणि विराट भाऊ परत फॉर्ममध्ये आलेत हे पाहणं खरंच आनंददायक आहे. गेली १५ वर्षं हे दोघे भारतीय क्रिकेटसाठी जे करत आहेत, ते पाहणं नेहमीच प्रेरणादायी आहे.”
“कर्णधार म्हणून बसून त्यांना बघणं म्हणजे सन्मान”
गिलने पुढे सांगितलं,
“खेळाडू म्हणून आम्हाला कधीही शंका नव्हती की हे दोघे परफॉर्म करू शकणार नाहीत. पण कर्णधार म्हणून बाजूला बसून त्यांना बघणं, टीमला विजयाकडे नेताना पाहणं – हे वेगळंच समाधान आहे.”
या वक्तव्याने गिलच्या मनात असलेला सन्मान आणि आदर स्पष्टपणे दिसला. युवा कर्णधार असूनही त्याने वरिष्ठ खेळाडूंप्रती आदर राखला आहे, ही भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक गोष्ट आहे.
स्वतःच्या बॅटिंगवर गिलची प्रामाणिक कबुली
आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना गिल म्हणाला,
“पहिल्या सामन्यात मी लेग साईडवर आउट झालो. काही वेळा सुरुवात चांगली मिळते पण मोठं स्कोअर होत नाही. त्यामुळे जास्त विचार करण्याचं काही कारण नाही. शेवटच्या दोन-तीन सामन्यात मी थोडा सावध खेळलो, पण आता रीदम परत मिळतोय.”
गिलने आपल्या खेळाकडे शांतपणे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे. युवा कर्णधार असूनही त्याच्यात प्रगल्भतेची झलक दिसली.
मालिकेचा शेवट विजयाने, टॉसचं नशीब पुढच्या मालिकेकडे!
India toss loss streak भारताने तिसरा सामना जिंकून मालिकेचा शेवट दमदार केला. टॉस हरूनही मैदानावर दाखवलेली कामगिरी ही टीमच्या आत्मविश्वासाचं द्योतक आहे.
हेही वाचा
Elon Musk चा धक्कादायक खुलासा! AI पासून क्रिप्टोपर्यंत डेटा चोरीचं गुप्त जाळं? Musk चा इशारा
गिलच्या “घरवालेही बोलतात टॉससाठी काहीतरी कर” या संवादाने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आणि सोशल मीडियावर या वाक्याची जोरदार चर्चा रंगली. टॉस हरत असला तरी टीम इंडियाचं नशीब बॅट आणि बॉलने जिंकतंय, हेच या मालिकेचं खरे यश म्हणता येईल !
हेही वाचा