Asia Cup 2025 Trophy Drama | भारताने पाकिस्तानला हरवलं, पण ट्रॉफीवर वाद! भारतीय संघाने पाकिस्तान मंत्री मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी नाकारली, बीसीसीआयने संताप व्यक्त करत ICC कडे तक्रार करण्याची तयारी दाखवली.
दुबई : रविवारी झालेल्या आशिया कपच्या थरारक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत करत विजेतेपद पटकावलं. मात्र, मैदानावरील उत्कंठावर्धक खेळानंतर जे घडलं त्याने क्रिकेटविश्व हादरलं. भारतीय संघाने पाकिस्तानचे गृहमंत्री व आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
हा प्रकार तब्बल 90 मिनिटे चाललेल्या नाट्यमय घटनांचा शिखरबिंदू ठरला. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू कुटुंबीयांसोबत मैदानावर आले होते. कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे कुटुंब अशा सर्वजणांचा आनंदी माहोल होता.
पण काही यार्डांवरच नक्वी आपल्या मंडळींसोबत उभे होते. बीसीसीआयने आधीच ACC च्या प्रतिनिधींना स्पष्ट सांगितलं होतं की संघ नक्वींकडून कोणताही सन्मान स्वीकारणार नाही.
नक्वींचा भारतविरोधी अजेंडा
Pakistan minister Mohsin Naqvi controversy – मोहसिन नक्वी यांनी यापूर्वी भारतविरोधी वक्तव्यं केली होती. त्यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या plane crash celebration चा संदर्भ देत, पहीलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर “ऑपरेशन सिंदूर”मध्ये भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा प्रचारला होता.
याचबरोबर, सूर्यकुमार यादवने भारतीय सेनेला पाठिंबा दर्शवला म्हणून त्याच्यावर ICC कडून कारवाई व्हावी, अशी मागणी नक्वी यांनी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता.
Asia Cup 2025 Trophy Drama ट्रॉफी वितरण थांबलं
सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी खेळाडूही मैदानात आले नाहीत. भारतीय खेळाडू इतर मान्यवरांकडून ट्रॉफी घेण्यास तयार होते, पण नक्वी स्टेजवर असताना जाण्यास तयार नव्हते. दुबई स्पोर्ट्स सिटीचे खालिद अल जरूनी ट्रॉफी देणार अशी चर्चा होती, मात्र नक्वी हटायला तयार नव्हते.
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “नक्वींनी जबरदस्तीने ट्रॉफी द्यायचा प्रयत्न केला असता तर आम्ही अधिकृत निषेध नोंदवला असता.”
यानंतर कार्यक्रम सूत्रसंचालक सायमन डूल यांनी व्यक्तिगत पुरस्कार जाहीर केले. पाकिस्तानी संघाने आपले पुरस्कार घेतले, पण डूल यांनी जाहीर केले की भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही.
आणि मग अनपेक्षित घडलं – नक्वी स्टेजवरून खाली उतरताच ACC कर्मचारीच ट्रॉफी घेऊन गेले. भारतीय खेळाडूंनी मग ट्रॉफीशिवायच मैदानावर फोटोसेशन केलं.
बीसीसीआयचा संताप
आशिया कप 2025 ट्रॉफी विवाद – बीसीसीआय सचिव देवजीत सैकीया यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं –
“भारतीय संघाने पाकिस्तानचे मुख्य नेते असलेल्या नक्वींकडून ट्रॉफी घेणं योग्य नाही असं ठरवलं. पण याचा अर्थ असा नाही की नक्वी ट्रॉफी व पदकं घेऊन निघून जातील. आम्ही अपेक्षा करतो की ती त्वरित परत दिली जातील.”
बीसीसीआय आता याबाबत मोठं पाऊल उचलणार आहे. नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या ICC परिषदेत भारत या वादग्रस्त घटनेवर अधिकृत आणि कडक निषेध नोंदवणार असल्याचं सैकीया यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानचा पाठींबा
पाकिस्तान कर्णधार सलमान अली आघा यांनी मात्र आपल्या ACC अध्यक्षाला पाठिंबा दिला. ते म्हणाले –
“ते ACC चे अध्यक्ष आहेत, ट्रॉफी देणं त्यांच्याच अधिकारात येतं.”
भारत-पाकिस्तान क्रिकेटवर प्रश्नचिन्ह
भारत पाकिस्तान सामना वाद – भारत-पाकिस्तान सामने नेहमीच जगभरातील क्रिकेटप्रेमींना मोहवतात. पण दुबईतील या वादानंतर भविष्यातील द्विपक्षीय सामने आणि बहुपक्षीय स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचं नियोजन अधिक कठीण होईल, अशी चर्चा सुरू आहे. कारण क्रिकेटमधला हा राग आता मैदानाबाहेरही वाढताना दिसतोय.
हेही वाचा
BCCI vs PCB: हरिस रऊफ-फरहानवर BCCI ची तक्रार, सूर्यकुमारवर PCB ची कारवाई !